वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महाराष्ट्र राज्य

पार्श्वभूमी

      गावाखेड्‌याकडून शिक्षणासाठी जिल्ह्यासारख्या ठिकाणी येतात. तसेच प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी समस्या यावरती संघटित रित्या शासन प्रशासना मध्ये समन्वय साधून उपाययोजना काढणारी एक समिती असावी. या हेतूने समितीची स्थापना झाली. भुकेल्याचे अन्न बनावे, तहानलेल्याचे पाणी बनावे, गरिबांचे छत बनावे, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांचे पुस्तक बनावे, कमजोरांची ताकत बनावे ह्या प्रामाणिक ध्येयाला समोर ठेवून दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी समितीची मुहुर्तमेढ वैभव शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रा. उत्तम बलखंडे यांच्या मार्गदर्शनातून ‘विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य’ आयु. राजरत्न बलखंडे यांनी मित्रांच्या सहकार्याने स्थापन केली.
     “विद्यार्थ्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय विकास घडवून आणण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सातत्याने काम करते. शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवून शासना सोबत समन्वय साधण्यासाठी काळानुरूप प्रयत्नशील व परिवर्तनशील राहील.” ही समितीची घटना आहे, याला अनुसरून समिती वर्षभरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी हिताचे काम सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून व तसेच आवश्यकता भासल्यास आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आवाज बनते.